Skip to main content

Posts

Showing posts from June, 2020

१०. शायिस्तेखानाची फजिती

शायिस्तेखानाजी स्वारी: विजापूरच्या आदिलशाहाने जंगजंग पछाडले. पण शिवरायांपुढे त्याचे काही चालले नाही. त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला. शेवटी आदिलशाहा नरम झाला. त्याने शिवरायांशी तह केला आणि स्वतंत्र राज्य मान्य केले. यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली. मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले. मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धुळधाण उडाली होती. त्या वेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाह होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या. त्यामुळे बादशहा चिडला. त्याने आपुला मामा शायिस्तेखान याला शिवरायांवर पाठवले. तो पुण्यावर चालून आला. त्याच्याकडे पाऊण लाख सैन्य होते. शेकडो हत्ती,उंट आणि तोफा होत्या. शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत घेत शायिस्तेखान आला. त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. तो पुढे पुढेच येत होता. आणि एकदा मात्र डोंगराच्या खिंडित मराठ्यांनी त्याला गाठले. मराठे अतिशय चपळ, भीमथडी तट्टावर बसणारे ! चटणी-भाकर खावी, अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगरदऱ्यांतून धावपळ करावी, यांत मराठे फार पटाईत. मराठयांच्या गनिमी काव्यामुळे शायिस्तेख...

९. शर्थीने खिंड लढवली

  पन्हाळा जिंकला आणि आदिलशाहा चिडला : अफजलखानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. त्यामुळे आदिलशाहा भयंकर चिडला. त्याला अन्नपाणी गोड लागेना. शिवरायांचा नाश करण्यासाठीच त्याने सिद्धी जौहर या सरदाराला पाठवले. त्याची मोठी फौज घेऊन सिद्धी जौहर निघाला. फाजलखान हि बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्या बरोबर निघाला. .........................................................................................           शिवभक्त- स्वामीनिष्ठावान वीर बाजीप्रभू देशपांडे ......................................................................................... पन्हाळगडा विषयी थोडंसं : १. पन्हाळगड हा महाराष्ट्रातील सर्वात जुना किल्ला समजल्या जातो. त्याचे निर्माण शिलाहार घराण्याचा राजा भोजराजा नृसिंह ह्याने १२०० वर्षाआधी केले होते. तो किल्ला नागवंशीय वंशाकडे असल्यामुळे त्याचे नाव पाली भाषेत होते आणि ते म्हणजे ' पन्नग्नालय ' .आणि त्याचा अर्थ अजिंक्य असा होतो. २. पन्हाळगडावर इ.स.१६६० मध्ये सिद्...

८. प्रतापगडावरील पराक्रम

आदिलशाही हादरली : विजापूरच्या दरबारातील गोष्ट. शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला. दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले. एकेक गाजलेले समशेरबहाद्दूर दरबारात हजर होते. आदिलशाही कारभार बघणारी बडीसाहेबा जातीने दरबारात हजर होती. दरबारापुढे महत्त्वाचा प्रश्न होता, "शिवाजीचा बिमोड कसा करायचा?"  बडीसाहेबा हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला, "सांगा, कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला?"  दरबारात शांतता पसरली. जो तो आपल्या जागी चूप ! शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार? जो तो एकमेकांकडे बघू लागला. तेवढ्यात धिप्पाड देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला. त्याचे नाव अफजलखान. ........................................................................................ अफझलखान ....................................................................... .................. 🤔अफजलखाना विषयी थोडे: ज्या अफझल खानाने शिवाजी महाराज्यांच्या ज्येष्ठ बंधूंना संभाजी राजांना फसवून मारले ,त्याच अफझल खानाला स्वतःच्या 64 बायकांना स्वतःच्या हातानी माराव्या लागला ते प...

७. स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त

जरब बसवली : शिवरायांच्या अवतीभोवती बारा मावळांतील मावळे गोळा झाले. शिवराय सांगतील ती कामगिरी बजावत होते. स्वराज्यासाठी जगायचे आणि स्वराज्यासाठी मरायचे, असे ते मानत होते. साधीभोळी मराठमोळी माणसे ती ! त्यांना शिवराय म्हणजे जीव की प्राण वाटत. पण शिवरायांच्या कार्याबद्दल मनातल्या मनात जळणारी, पिढ्यानपिढ्या आदिलशाहीची चाकरी करण्यात धन्यता मानणारी अशी काही मंडळी होती. त्यांना शिवरायांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटे. निंबाळकर, घोरपडे, मोरे इत्यादी मराठे सरदार शिवरायांच्या स्वराज्याला विरोध करत. अशांचा बंदोबस्त करणे शिवरायांना भाग पडले. खंडोजी आणि बाजी घोरपडे हे मराठे सरदार आदिलशहाच्या चाकरीत होते. आदिलशहाने त्यांना शिवरायांच्या विरुद्ध चिथावले. कोंढाणे भागात त्यांनी धुमाकूळ माजवला. परंतु शिवरायांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. शिवरायांनी त्यांना पिटाळून लावले. तसेच फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर, हे तर शिवरायांचे मेहुणे. त्यांनीही आदिलशाहीशी संगनमत केले. शिवरायांविरुद्ध कारस्थाने सुरू केली. शिवरायांनी फलटण वर हल्ला करून निंबाळकरास कैद केले. शिवरायांचा जवळचा नातलग संभाजी मोहिते हा शिवरायां...

६. स्वराज्याचे तोरण बांधले

रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. पण केवढे अवघड कार्य होते ते ! दिल्लीचा मोगल बादशहा, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज, आणि जंजिऱ्याचा सिद्धी अशा चार सत्ता त्या वेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या. या सत्तांचा दरारा मोठा होता. त्यांच्याविरुद्ध ब्र काढायची कुणाची हिंमत नव्हती. अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता. कुठे शत्रूच्या फौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्यांचे अल्प बळ ! शिवरायांचा निश्चय अढळ होता. त्यातूनच बळ निर्माण झाले. तोरणगड : शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागिरी होती. जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते. किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य. ज्याचे किल्ले त्याचे राज्य ! किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार. तेव्हा एखादा भक्कम केला लवकर हस्तगत केला पाहिजे, असे शिवरायांनी मनाशी ठरवले.  तोरणा किल्ला शिवरायांचा डोळ्यापुढ...

५. स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा

रायरेश्वराचे शिवालय : पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे शिवालयात मोठे रमणीय स्थान होते. तेथे १६४५ साली एक विलक्षण प्रसंग घडला. शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यांमधील काही मावळे मंडळी मसलतीसाठी तिथे जमली होती. त्या किर्र अरण्यात झाडाझुडपांत लपलेल्या रायरेश्वराच्या शिवालयात शिवरायांबरोबर कसले खलबत ते मावळे करत होते. श्रीशंकरापाशी कोणता वर मागत होते?                           रायरेश्वराचे मंदिर बालशिवबाजी तेजस्वी वाणी : शिवराय अजून वयानं कितीतरी लहान होते, पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती. त्यांनी एक मोठा घाट घातला होता. त्या शिवालयात जमलेल्या सवंगड्यांना ते कळकळीने म्हणाले, "गड्यांनो, मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? आमचे वडील शहाजीराजे विजापूर ते सरदार आहेत. त्यांनीच आम्हाला येथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे. दादाजीपंत या जहागिरीचा कारभार पहात आहेत. गांवकऱ्यांमधील सर्व कटकटी मिटवत आहेत. कोंढाण्याचे सुभेदार म्हणून त्यांचा सर्वत्र वचक आहे. सर्व कसे छान चालले आहे. पण गड्यांनो, मला यात मुळीच आनंद...